पाणीपट्टी थकबाकीदारांवर महानगरपालिकेची धडक मोहिम

 

कोल्हापूर  : कोल्हापूर शहर पाणी विभागाकडील थकीत पाणीपट्टी वसुल करणेची मोहिमेअंतर्गत दिनांक 08/09/2017 ते 13/10/2017 या कालावधीत सुमारे 414 थकबाकीदारांवर कारवाई करुन 35 कनेक्शन बंद करणेत आलेले आहेत. यामध्ये वसंत सुबराव चित्रे, अस्मिता अमोल पाटील, पंचरत्न डेव्हलपर्स (संजय कोळेकर), मल्लाप्पा आण्णाप्पा कलगुटकी, तानाजी कागलकर, जनार्दन बाळा पोवार, साऊबाई लक्ष्मण पोवार, संजय रामचंद्र सावंत, बाळाबाई जयसिंग साठे, पांडुरंग रामचंद्र बोंगाळे, आनंदा दत्तात्रय चौगुले, सदाशिव लक्ष्मण थोरवत, दत्तात्रय हरी कांबळे, चंद्राकांत हिंदुराव मोरस्कर, दादू दत्तात्रय चौगुले, सचिन रावसाहेब पाटील, अभिजीत पांडूरंग मगदूम, शोभा ज्ञानदेव पाटील, संजय ईʉाराप्पा जगजंप्पी इत्यांदीवर कारवाई करुन 35 कनेक्शन बंद करणेत आलेली आहेत. रक्कम रु.31,02,528/- इतकी थकबाकी आणि दंड वसूल करण्यात आला. याकामी दादू चौगुलेनगर, मोरेमाने नगर, दत्त भागीरथी नगर, हस्तीनापूर नगर, जिवबाब नाना नगर, बापूरामनगर, दौलतनगर, शाहूनगर, शाहूपुरी या भागातील थकबाकीदारांवर कनेक्शन खंडीत करणेची कारवाई करणेत आली. तसेच कनेक्शनधारकांने थकबाकी भरुन महानगरपालिकेस सहकार्य करावे.
सदरची कारवाई अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, जल अभियंता सुरेश कुलकर्णी, उपजल अभियंता कुभार व अधिक्षक प्रशांत पंडत यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख मोहन जाधव, रणजित संकपाळ, संतोष कोळी, ताजुद्दीन सिदनाळे, मिटर रिडर संजय मिरजे, पृथ्वीराज चव्हाण, पंडीत भादुलकर यांनी कारवाईमध्ये भाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!