हि मालिका संस्कृती व संस्कार यांचा आधार आहे : आबा तुझ्यात जीव रंगला…उत्सव कलाकरांचा

 

हि मालिका संस्कृती व संस्कार यांचा आधार आहे : आबा तुझ्यात जीव रंगला…उत्सव कलाकरांचा

गेली अडीच तीन वर्षे आम्ही कुटुंबापासून लांब आहे. पण सेटवरच आमचं एक वेगळं कुटुंब बनलं आहे. इथं आम्ही जास्त एकत्र असल्याने हेच आमचं घर आहे असे आम्हाला वाटते. फक्त दिवाळीच नाही तर प्रत्येक सण आम्ही इथे साजरा करतो. स्पॉटबॉयपासून सर्व कलाकार लाइट्समन, तंत्रज्ञ यांचे वाढदिवस आम्ही साजरे करतोय. समान मान समान वागणूक यामुळे आम्ही बांधले गेलो आहोत. सेटवर दिवाळी एपिसोड च्या शूटिंगची गडबड सुरू आहे. शूटिंग पूर्ण झाल्यावर आम्हाला दोन दिवसाची सुट्टी मिळणार आहे. पण प्रेक्षकांना जी मालिका पाहायला मिळते त्याच्या मागे अनेक लोकांचे अपार कष्ट आहेत. 80 लोक सोळा तास काम करत असतात. तेव्हा ही मालिका लोकांपर्यंत पोहोचते. ही कोल्हापूरच्या मातीतली गोष्ट आहे. पण ग्रामीण भागात इतक्या सोयीसुविधा उपलब्ध नाहीत.मुंबईत सर्व गोष्टी उपलब्ध असतानाही कोल्हापुरात शूटिंग करून दिग्दर्शक अनिकेत साने यांनी अवघड काम पूर्ण केले आहे. त्यामुळे कोल्हापूरची संस्कृती, सण, परंपरा खऱ्या स्वरूपात लोकांपर्यंत या मालिकेद्वारे पोहोचल्या आहेत. संस्कृती व संस्कार यांच्या आधार म्हणजे ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका आहे असे गायकवाड कुटुंबातील प्रमुख प्रतापराव गायकवाड (आबा) म्हणजेच मिलिंद दास्ताने यांनी स्पीड न्यूजशी मुलाखतीमध्ये सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!