हद्दवाढ न होणे हे तर तत्कालीन ‘दक्षिण’च्या आमदारांचे अपयश: ‘आप’चे संदीप देसाई

 

कोल्हापूर: राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शहराच्या दौऱ्यावर असताना कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढीचा प्रस्ताव द्यावा अशा सूचना केल्या. या पार्श्वभूमीवर अनेक कार्यकर्त्यांनी ही मागणी लावून धरत प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना निवेदने सादर केली. परंतु संबंधित प्रस्ताव मे अखेरपर्यंत राज्य शासनाला पाठवणे शक्य नसल्याचे संगीतले. हद्दवाढीच्या चर्चेला पुन्हा एकदा सुरुवात झाली असताना ती यशस्वीपणे पुढे जावी यासाठी सर्व संबंधितांचा संवाद गरजेचा आहे. शहराच्या विकासासाठी हद्दवाढ झालीच पाहिजे, ती करत असताना आजूबाजूच्या गावांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. शहरातच दुरवस्था दिसली तर हा विश्वास निर्माण करणे अवघड आहे. महापालिकेने सर्वात प्रथम संबंधित गावांना त्यांच्या विकासाठी आपल्याकडे असलेला आराखडा सादर करावा जेणेकरून त्यांचा विश्वास संपादित करणे सोपे होईल. त्याचबरोबर संबंधित गावांमधून होणाऱ्या राजकीय विरोधाला जिल्ह्याच्या नेत्यांनी तसेच कोल्हापूर दक्षिणच्या आमदारांनी पुढाकार घेऊन मिटवाव लागेल.कोल्हापूर दक्षिण हा मतदारसंघ 2009 साली झाला. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व ना. सतेज पाटील, अमल महाडिक यांनी केले आहे. ते प्रतिनिधित्व करत असताना हद्दवाढीचे प्रस्ताव त्या-त्या वेळी पाठवण्यात आले आहेत. आणि योगायोगाने त्यांच्याच पक्षाची म्हणजे काँग्रेस व नंतर भाजपची सत्ता राज्यात असताना हा प्रस्ताव पुढे सरकला नाही ही वस्तुस्थिती आहे. हद्दवाढीमध्ये प्रस्तावित बहुतांश गावे करवीर तालुक्यातील कोल्हापूर दक्षिण या मतदारसंघातील आहेत. हद्दवाढ न होणे हे तर तत्कालीन ‘दक्षिण’च्या आमदारांचे अपयश आहे. विद्यमान आ. ऋतुराज पाटील व जिल्ह्याचे पालकमंत्री मा. सतेज पाटील यांनी पुढाकार घेतल्यास गावांच्या ‘हट्टवादास’ विराम मिळून ‘हद्दवाढ’ होणे शक्य आहे. म्हणूनच गावांची, गावकऱ्यांची व गावातील पुढाऱ्यांची समजूत काढण्यासाठी ‘दक्षिण’च्या लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा अन्यथा शहर व ग्रामीण या वादाचे खापर त्यांनी आपल्या डोक्यावर घ्यावे.अशी मागणी आम आदमी पार्टी करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!