

दिल्ली येथे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या कार्यालयात खासदार संभाजीराजे यांनी ९ ऑगस्ट रोजी मुंबई येथे होणा-या मराठा क्रांती मोर्चा संदर्भात भेट घेतली या प्रसंगी खा. संभाजीराजे यांनी मराठा क्रांती मोर्चाची सर्व माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना सांगितली तसेच महाराष्ट्रातून लाखो लोक मोर्चास येणार असलेने वहानांची सोय होणे अवघड असलेने रेल्वेंला अतिरिक्त डब्याची सोय केली तर सर्व मराठा बांधव सुरक्षित पणे मोर्चास येऊ शकतील असे समजावून सांगितले.
या मोर्चासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक सहभागी होणार आहेत. त्यांना मुंबईत रेल्वेने तातडीने पोहचण्यासाठी प्रत्येक गाडीला जादा डबे वाढवून देण्यासह परतीच्या प्रवासासाठी ही मुंबईतून राज्याच्या काना-कोपऱ्यात परत जाण्यासाठी अतिरिक्त डबे रेल्वेला जोडण्यात येण्याची मागणी ही संभाजीराजे यांनी केली होती. तोंडावर आलेल्या या मोर्चाचे गांभीर्य लक्षात घेवून रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून ८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी मुंबईकडे जाणा-या व ९ ऑगस्ट रोजी सकाळपर्यत पोहचणा-या सर्व गाड्यांना जादा डबे जोडण्यात येतील. तसेच ९ ऑगस्ट रोजी मुंबईहून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात परत जाणा-या गाड्यांना अतिरिक्त डब्याची व्यवस्था करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.
Leave a Reply