
कोल्हापूर : जिल्ह्यात सध्या दमदार पाऊस सुरु असून राधानगरी धरणातून 12196 क्युसेक्स तर दुधगंगा धरणातून 4 हजार क्युसेक्सचा विसर्ग सुरु आहे. नदी काठच्या लोकांनी सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी केले आहे.
राधानगरी धरणाचे सायंकाळी 5 वाजेपर्यंत 7 दरवाजे उघडण्यात आले असून या धरणातून भोगावती नदीत 12196 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे तर दुधगंगा धरण पूर्ण भरले असून या धरणातून 4 हजार क्सुसेक्सचा विसर्ग सुरु आहे. जिल्ह्यातील 13 बंधारे पाण्याखाली केले असून यामध्ये पंचगंगा नदीवरील राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी आणि शिंगणापूर. भोगावती नदीवरील हळदी, सरकारी कोगे, खडक कोगे. कासारी नदीवरील यवलूज.कुंभी नदीवरील शेणवडे आणि दुधगंगा नदीवरील सोळंबी या बंधाऱ्यांचा समावेश आहे.
सरासरी 29.83 मि.मी. पाऊस
जिल्ह्यात काल दिवसभरात सरासरी 29.83 मि.मी. पाऊस झाला असून सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात पडला आहे. गेल्या 24 तासात जिल्हयात पडलेल्या पावसाची तालुकानिहाय नोंद पुढीलप्रमाणे आहे.
तालुकानिहाय पाऊस मि.मी. मध्ये पुढील प्रमाणे आहे. हातकणंगले 8.12, शिरोळ 7, पन्हाळा 26, शाहूवाडी 30.67, राधानगरी 33.83, गगनबावडा 104.50, करवीर 17, कागल 15.57, गडहिंग्लज 16.57, भुदरगड 26, आजरा 36.25, व चंदगडमध्ये 35.50 मि.मी. अशी नोंद झाली आहे. जिल्ह्यात 1 जूनपासून आतापर्यंत एकूण 13369.778मि. मि. पाऊस झाला आहे.
Leave a Reply