
कोल्हापूर: आज दुपारी बारा वाजता दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड या राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याचे संकेत मिळत आहेत.नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेची सांगता झाली. सरकारी यंत्रणा यामुळे निवडणूक प्रक्रिया सुरू करणार असल्याचे संकेत दिले जात आहेत. विधानसभा निवडणुकीबरोबरच सातारा येथील एका जागेसाठी लोकसभेची पोटनिवडणूक ही याच वेळी होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. साधारण १५ ते १९ आक्टोबर या दरम्यान सर्व निवडणूक कार्यक्रम राबविला जाण्याची शक्यता आहे. आज दिल्ली येथे सर्व तारखा जाहीर करण्यात येतील.
Leave a Reply