
कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये महापूर आला होता यामध्ये तिन्ही जिल्ह्यांचे पूर्ण नुकसान झाले होते. यावेळी तात्कालीन सरकारने ६८१३ कोटी रूपये देण्याची घोषणा केली होती. मात्र केंद्र सरकारने ९०० कोटी रूपये मंजूर केले होते, तेही अजून पर्यंत मिळाले नाहीत.याबाबत महाराष्ट्र सरकारने पूर नुकसानीचा अंतिम अहवाल अजून केंद्र शासनास दिला नाही अशी माहिती गृह मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयामध्ये दिली आहे.याबाबीमध्ये राज्यपालांनी त्वरीत लक्ष घालून कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्तांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी पत्राद्वारे केली आहे.
Leave a Reply