शेतकऱ्यांचे विविध प्रश्न घेऊन खा. संभाजीराजे केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या भेटीला 

 

महापुर आणि परतीच्या अतिरिक्त पावसामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याआधी महाराष्ट्रात अनेक वर्ष दुष्काळ होता. आजकाल दिवसागणिक किमान दोन शेतकरी आत्महत्या करीत आहेत. महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या शेतकी अर्थव्यवस्थेचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने लवकरात लवकर या विषयात हस्तक्षेप करून मार्ग काढावा ही विनंती आज खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केली.अनेक विमा कंपन्या सुद्धा शेतकऱ्यांना अकारण त्रास देत आहेत. काही वर्षातच दहा हजार कोटींचा नफा कामावणा-या विमा कंपन्या यावर्षी टेंडर मध्ये सहभागी सुद्धा झाल्या नाहीत. अशाप्रकारे शेतकरी असेल किंवा सरकार असेल सर्वांच्या हातावर तुरी दिल्या. कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी आश्चर्य व्यक्त करत तात्काळ चौकशी करण्याचे आश्वासन दिले. या संदर्भात लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले. महाराष्ट्रातील, शेतकऱ्यांना लवकरात लवकर आणि सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!