
कोल्हापूर: गुणवत्ता,
कौशल्य,आत्मविश्वास, बाजाराचा शोध आणि उपलब्ध संधीया पंचसूत्रीच्या जोरावर यशस्वी उद्योजक होणेशक्य आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्याआण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकासमहामंडळाचे उप-सरव्यवस्थापक अशोक मोरे यांनीआज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकताविकास केंद्र, युवक कल्याण कक्ष आणि विद्यापीठ कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आज उद्योजकता विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मानव्यशास्त्र इमारतीत झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.
या कार्यशाळेस युवक-युवतींचा अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद लाभला. सुमारे २१९ जण या एकदिवसीय कार्यशाळेत सहभागी झाले
Leave a Reply