झी स्टुडीओज् व नागराज मंजुळे निर्मित ‘नाळ’ येत्या १६ नोव्हेंबरला प्रदर्शित 

 

दर्जेदार चित्रपट आणि झी स्टुडीओज् हे समीकरणप्रेक्षकांसाठी काही नवीन नाही. गेल्या काही वर्षांत मराठीतील चित्रपटांनी विविध विषयांना हात घालत, अनोख्या पद्धतीने मांडणी करत मराठी चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर पोहोचवलं आहे. ‘फँड्री’ आणि ‘सैराट’सारख्या चित्रपटांच्या अभूतपूर्व यशानंतर झी स्टुडीओज्आणि नागराज पोपटराव मंजुळे “नाळ” नावाचा चित्रपटप्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. सुधाकर रेड्डीयक्कंटी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून येत्या १६नोव्हेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे. सुधाकरयांनी सैराट, विहीर, देऊळ आणि वीरे दि वेडिंग सारख्यासिनेमांचे छायाचित्रीकरण केले असून, ‘नाळ’ मधून ते दिग्दर्शनातील पदार्पण करीत आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. या सोहळ्याला नागराज मंजुळे,दिग्दर्शक सुधाकर रेड्डी, देविका दफ्तरदार. दीप्ती देवी तसेच झी स्टुडिओज् चे सी.इ. ओ. शारिक पटेल, बिजनेस हेड मंगेश कुलकर्णी, कन्टेन्ट हेड अश्विनीकुमार पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. 

 

असं म्हणतात, जगात सुंदर असं एकच मूल आहे आणि तेप्रत्येक आईपाशी आहे. अशाच एका आई आणि मुलाचीगोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाची कथा आहेलहानग्या चैतन्यची. चैतू ८ वर्षाचा आहे. नदीच्या काठीवसलेल्या महाराष्ट्रातील एका दूरच्या खेड्यात तो राहतो. त्याचे वडील गावातील एक प्रतिष्ठित जमीनदार आहेत जेचैतूचे सगळे हट्ट पुरवतात. प्रेमळ आणि मायाळू आई त्याचेखूप लाड करते. अशा सुंदर वातावरणात वाढणाऱ्याचैतन्यच्या भावविश्वाचा अनपेक्षित प्रवास नाळच्याकथासूत्रात उलगडताना दिसेल. ‘नाळ’ सारखा सिनेमाखऱ्या अर्थाने चित्रभाषेत बोलू शकतो हे पुन्हा एकदा सिद्धहोईल यात शंका नाही.

 

मृदगंध फिल्म्सचे वैशाली विराज लोंढे, निखिल वराडकर, नितीन प्रकाश वैद्य, प्रशांत मधुसूदन पेठे आणि सुधाकर रेड्डी यंकट्टी तसेच आटपाटचे नागराज मंजुळे यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून झी स्टुडिओज् आणि नागराज मंजुळे यांची प्रस्तुती आहे.चित्रपटाची कथाआणि पटकथा सुधाकर रेड्डी यंकट्टी यांची असून, संवादनागराज मंजुळे यांचे आहेत. चित्रपटाचे संकलन संचारीदास मौलिक यांनी केलंय. सतीश पोतदार, प्रशांतदेशमाने यांचे कला दिग्दर्शन या चित्रपटाला लाभले असूनअद्वैत नेमलेकर यांचे पार्श्वसंगीत आहे. तसेचचित्रपटातील वेशभूषा साकारली आहे सचिन लोवाळेकरयांनी. या चित्रपटातील ‘जाऊं दे न व’ ह्या गाण्याला तीन दिवसात १० लाख व्हियुज मिळाले असून हे गाणे ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी संगीतबद्ध तसेच शब्दबद्ध केले आहे व सा रे ग म प लिटिल चॅम्प मधून अल्पावधीतच सर्वांचा लाडका झालेला जयस कुमार ह्याने हे गायले आहे. आणि अर्थातच सुधाकर रेड्डी यक्कंटी यांनी. दिग्दर्शनाबरोबरच  छायाचित्रणातूनही  चैतूचे भावविश्व चितारले आहे. चित्रपटात नागराज मंजुळे, देविका दफ्तरदार, सेवाचव्हाण, दीप्ती देवी, ओम भुतकर आणि बालकलाकारश्रीनिवास पोकळे यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!