
कोल्हापूर : कोल्हापूर मधील सहा वर्षीय चिमुकला केदार साळुंखे यांनी सांगली ते कोल्हापूर स्केटिंगच्या माध्यमातून ५५ किलोमीटरचे अंतर ३.३८मिनिटात पूर्ण करून विश्वविक्रम केला आहे. त्याच्या या धाडसाचे कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र कौतुक केले जात आहे. आज सकाळी ६.३० वाजता सांगली येथील अशोक कामटे विश्रामगृह येथून त्याने सांगली डी.वाय.एस.पी.वीरकर यांच्या उपस्थितीत आपल्या या उपक्रमास विक्रमास सुरुवात केली होती . कोल्हापूर मध्ये पोलीस अधीक्षक कार्यालय येथे १० वाजून ८ मिनिटांनी पोहोचला कोल्हापूर मध्ये आल्यानंतर त्याचे जल्लोषी स्वागत करण्यात आले विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते त्याचे जल्लोषी स्वागत करण्यात आले .
२६ नोव्हेंबर २००८ साली मुंबईतील हॉटेल ताज वर दहशतवादी हल्ला झाला होता या घटनेला दहा वर्ष झाली आहेत या हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी ,अन्य पोलिस व नागरिक यांना मानवंदना देण्यासाठी व श्रद्धांजली वाहण्यासाठी तसेच देशात शांतता राहावी म्हणून स्टॉप टेरेरिझम हा संदेश घेऊन कोल्हापूर मधील सहा वर्षीय केदार विजय साळुंखे या चिमुकल्या मुलाने सांगली ते कोल्हापूर हे ५५ किलोमीटरचे अंतर स्केटिंग रॅलीद्वारे पूर्ण केले.
यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली कोल्हापूर येथील पोलीस ग्राउंड येथे उभा करण्यात आलेल्या तिरंगा या ठिकाणी त्याचा भव्य सत्कार करण्यात आला. त्याच्या या विश्वविक्रमाची नोंद एशिया पॅसिफिक बुक ऑफ रेकॉर्ड ,नॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड आणि चाईल्ड बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड (ग्लोबल) यामध्ये झाली.
केदार विबग्योर हायस्कुल कोल्हापूर मध्ये शिक्षण घेत आहे. तो वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय साळुंखे व पोलिस उपाधिक्षक स्वाती गायकवाड साळुंखे यांचा मुलगा आहे .कोल्हापूरमध्ये आल्यानंतर त्याचे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री.विश्वास नांगरे प. ,जिल्हाधिकारी श्री.अविनाश सुभेदार,महापौर सौ.शोभा बोन्द्रे ,स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे श्री अभयकुमार साळुंखे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झंजपथक व पोलीस बँड वाजवून स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना २६/११ ला झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्यांना केदार साळुंखे यांनी स्केटिंगद्वारे मानवंदना दिली आहे. यावेळी बोलताना विश्वास नांगरे पाटील यांनी केदारचे हे विशेष कार्य आहे त्याच्या आई-वडिलांनी त्याला योग्य मार्गदर्शन करून चांगले घडविले असून भ विष्यात त्याचे भविष्य चांगले आहे कोल्हापूरमध्ये ऐतिहासिक तिरंगा ध्वज असलेल्या ठिकाणी ज्यांनी काम केले त्यांच्यासाठी मानवंदना देणे हे वेगळं कार्य आहे सहा वर्षे चिमुकल्या केदारने हे केले आहे येथील मातीच्या कणाकणात शौर्य आहे बलिदानाची गाथा आहे पण त्याचा इतिहास आहे अशा या भूमीत ला हा मुलगा आहे याचा आदर्श घेण्यासारखे काम त्यांनी केले आहे पुत्र व्हावा ऐसा अशा शब्दात त्यांनी त्याचे कौतुक केले बरेच खेळाडू विक्रम करीत आहेत केदार हा इतका छोटा असूनही त्याने हा विक्रम केला निश्चितच तो प्रेरणादायी व आदर्शवत आहे तो भविष्यात चांगला खेळाडू असणार आहे सर्वांनी फिटनेस ला महत्व देणे गरजेचे असून चांगल्या सवयी व चांगले व्यायाम करणे गरजेचे आहे लहान मुलांनी मोबाईल दूर ठेवले तर त्यांचे जीवन चांगले होणार आहे असे सांगितले .
यावेळी महापौर सौ शोभा बोंद्रे यांनी केदार चे काम उल्लेखनीय असून स्टॉप टेरेरिझम च्या संदेश त्यांनी दिलेला आहे तो उल्लेखनीय आहे माझ्या त्याला शुभेच्छा आहेत असे उद्गार काढले यावेळी विश्वविक्रम मनमोहन रावत यांनी केदार सहा वर्षाचा आहे त्याने हा विक्रम करून परिवाराबरोबर समाजाचे व देशाचे नाव उज्वल केले आहे त्याने ब्रेकप साठी लागणारे ४२. १९५ किलोमीटरचे अंतर २ तास ४२ मिनिटात पूर्ण केले . ३ तास ३८ मिनिट त्याने ५५ किलोमीटरचे अंतर पूर्ण केल्याचे सांगितले केदारचे कोच महेश कदम यांनी केदार हा चार ते साडेचार तास नियमित प्रॅक्टिस करत होता त्याने हा विक्रम केला आहे त्याचे २२७ देशात नाव झाले आहे आणि तो इतका लहान मुलगा त्याचा विक्रम पहिला विक्रम आहे त्याने शाहू महाराजांचे नाव उज्वल केल्याचे सांगितले.
या उपक्रास कोरगावकर ट्रस्ट, रग्गेडियन , यश फ़ाऊंडेशन DAG RIDERSयाचे सहकार्य लाभले आहे.जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या हस्ते व विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांच्या वतीने शहिदांना मानवंदना व श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .याचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
केदार हा अडीच वर्षाचा असल्यापासून स्केटिंगचे प्रशिक्षण राजश्री श्री छत्रपती शाहू महाराज प्रशिक्षण केंद्र येथे घेत आहे शिक्षक महेश कदम तेजस्विनी कदम व धनश्री कदम यांचे त्याला सहकार्य केले.त्यांनी आतापर्यंत १०५ किलोमीटर स्केटिंग रॅली कोल्हापूर ते अजनी सांगली पूर्ण केली आहे जी ५ किलोमीटर अंतराची लोकमत मॅरेथॉन त्याने पूर्ण केली आहे त्याने आतापर्यंत ४ गोल्ड मेडल ,६ सिल्वर मेडल आणि दोन ब्राँझ मेडल मिळवले आहेत.
सदर वेळी विबग्योर हायस्कुलसाय उपप्राचार्या तसेच प्रशिक्षक प्रा महेश कदम , तेजस्विनी कदम , धनश्री कदम डाॅ सायरस पूनावालाचे, डॅा सरदार जाधव, क्रिडा अधिकारी यश पेटस डॅग रायडरयांचा सत्कार करण्यात आला.यावेळी कोरगावकर ट्रस्टच्यावतीनेही केदारचा सत्कार करण्यात आला .अमोल कोरगावकर,राज कोरगावकर,आकाश कोरगावकर,याचे विशेष सहकार्य लाभले. सुत्रसंचालन सागर बगाडे यांनी केला.यानंतर त्याची मिरवणूक काढण्यात आली.
Leave a Reply